वन्यप्राण्यांन मुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई तात्काळ मंजूर करा।
राजुरा: शेतकरी म्हटलं की अनंत प्रश्न आणि हातात नसलेली उत्तरे देत निर्धाराने शेती व्यवसाय करणारा होय. पीक उत्पादनावर दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवेळी पाऊस,पावसातील मोठा खंड, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, हवामानातील बदल, बाजार भावातील चढ उतार अशा असंख्य बाबींचा परिणाम होत असतो. त्याच बरोबर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्यांना स्वतःला, कुटुंबाला, त्यांच्या पाळीव प्राण्यांना, पिकांना, फळझाडांना त्रास सोसावा लागतो. विविध आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा विपरीत परिस्थितीत वन्य प्राण्यापासून होणाऱ्या हानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनामार्फत दिली जाते. नुकतेच कापसाचे पीक आले कापसाच्या झाडाला बोडांची चांगली लाग असता. त्यात डुकरांनि कपाशीच्या पिकात थैमाम घातला आहे. ह्या करीत शेतकऱ्यांनी वनविभागाला नुकसान भरपाई करिता अर्ज सादर केले आहे. परंतु सातत्याने अर्ज करून देखील नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यात अर्जा करिता लागलेला खर्च देखील शेतकऱ्यांना पुरवत नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग रोकण्या करीत झालेल्या ताळेबंदी मुळे शेतकऱ्यांना देखील आर्थिक संकटाला समोर जावे लागत आहे. अश्या हालकीच्या परस्थिती मध्ये शेतकऱ्यांना शाषनाकडून तात्काळ आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी.