चिखली येथे मतदान जनजागृती कार्यक्रम

चिखली येथे मतदान जनजागृती कार्यक्रम


     ग्रामीण व कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी मुजाहिदबेग जब्बारबेग मिर्झा यांचा चिखली येथे मतदान जनजागृती कार्यक्रम.
       भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. जिथे प्रत्येक प्रौढ नागरिक आपल्या मताचा वापर करण्यास स्वतंत्र असतो. सरकार बनविण्यात देशातील प्रत्येक मतदारांची महत्त्वाची भूमिका असते. सरकार स्थापना करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे. १-१ च्या  मताने सरकार बनते आणि बिघडते.  म्हणून प्रत्येकाने निपक्षपातीपणे मतदान केले पाहिजे आणि राष्ट्र निर्मितीत त्यांचा सहभाग निश्चित केला पाहिजे, तसेच देशातील विकासासाठी सक्षम व्यक्तीच्या निवडीमध्ये सहकार्य केले पाहिजे जेणेकरून आपला देश सतत प्रगतीच्या नव्या उंचावर येऊ शकेल. प्रत्येक नागरिकाने त्यांच्या मत अधिकाराचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि जो कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता देशाच्या विकासात योगदान देईल आणि जनहितासाठी आणि त्यांच्या विकासासाठी कार्य करेल.
      वयाच्या 18 व्या वर्षानंतर भारतातील प्रत्येक नागरिकाने त्यांना मतदान करण्यासाठी मतदार यादी मध्ये त्यांचे नाव तपासावे आणि सरकारकडून वैद्य ओळखपत्र घेऊन जावे असे मार्गदर्शन केले.
        या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए. ठाकरे, उपप्राचार्य एम. व्ही. कडू व कार्यक्रम अधिकारी एस. एस. सरप  सर यांचे मार्गदर्शन लाभले.