शेतकऱ्यांच्या प्रलंबित व विविध मागण्यांसाठी काॅग्रेसचे निवेदन
सचिन मेश्राम - मारेगाव
मारेगांव तालुका हा अनेक समस्यांनी ग्रासलेला तालुका असून शेतकऱ्यांसंबंधी असो, विजेच्या संबंधात, रस्त्याचा संबंधात अशा समस्या मारेगांव तालुक्यात निर्माण झाल्या असून.
शेतकऱ्यांच्या सिंचनाकरीता २४ तास विज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना चौवीस तास विज उपलब्ध करून देण्यात यावी.शेतकऱ्यांचे ए. जी. चे विजबिल संपूर्ण माफ करण्यात यावे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असून नविन रस्ते बांधकामाकरीता योग्य उपाययोजना करण्यात याव्या.
मागील २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाईकरीता पिकविमा त्वरीत मंजूर करुन शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम त्वरीत जमा
मागील वर्षी आलेल्या पुरामुळे वर्धा नदीच्या पुलामुळे मार्डी व कुंभा सर्कलच्या शेतकऱ्यांचे पुर्णतः शेत पिकासह खरडून गेले त्यांना विशेष पॅकेज देवून आर्थीक मदत करण्यात यावी.
महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्याचे कर्जमाफ करण्याचे आश्वासन दिले त्यानुसार कर्जमाफी करण्यात यावी.
कापसाला १२५०० रुपये व सोयाबीनला ८५००/- रुपये भाव देण्यात यावा.
तालुक्यातील माडीं सब स्टेशनवरून केगांव ए.जी. फिडरचे ९ खडकी सब स्टेशनवर कुभा ए.जी.फिडर चे १५ गाव मारेगांव सब स्टेशनवरून नवरगांव ए.जी. फिर स्टेशनवरून बोटोणी ए.जी. फिडर यांना ८ तासांऐवजी २४ तास विज पुरवठा देण्यात यावा
नुकत्याच चालू हंगामात शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीकरीता आर्थीक सहाय्य देण्यात यावे.
जंगली जनावरांचा बंदाबेस्त सरकारने त्वरीत करावा. वरील सर्व मागण्या येत्या ७ दिवसात पुर्ण कराव्या अन्यथा मारेगांव तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने आमरण उपोषण किंवा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, शहराध्यक्ष शंकर मडावी,युवा तालुका अध्यक्ष आकाश बदकी, युवा शहराध्यक्ष समिर सय्यद , शैलेश आत्राम, तुळशीराम कुमरे, मंगेश ऊईके, विनोद आत्राम, गोपाळ खामनकर, किशोर गौरकार,धनराज आस्वले, अनील आडसरे यांच्या सह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.