गावकरी, सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले अन पांदन रस्त्याचे कामं सुरु झाले

गावकरी, सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले अन पांदन रस्त्याचे कामं सुरु झाले

( लोकवर्गणी तुन होणाऱ्या वाऱ्हा पांदन रस्ताची मतदारसंघात चर्चा ) 
 

राळेगाव -प्रशांत भगत 

         'जे गावं करी ते राव न करी ' अशी एक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे.वाऱ्हा येथील गावाकऱ्यांनी या म्हणीतील आशय प्रत्यक्षात आणणारे कामं करून एक आदर्श निर्माण केला. वाऱ्हा राळेगाव मार्गांवरील पांदन रस्ता लोकवर्गणीतून आकारास येऊ घातला आहे. पावसाळा संपला आणि ठरल्याप्रमाणे रस्त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली.या स्तुत्य उपक्रमाला मदतीचा हात दिला तॊ सामाजिक कार्यकर्ते रमेश कनाके यांनी.
                शेताच्या बांधा पर्यंत रस्ते देण्याच्या घोषणा वारंवार झाल्या. म. ग्रा. रो. ह. योजनेतून हे कामं करण्याबाबत शासनादेश निर्गमित झाले पण यात तांत्रिक अडचणी असल्याने पांदन रस्ते प्रत्यक्षात काही अस्तित्वात आले नाही. राळेगाव तालुक्यात खस्ता पांदन रस्ते ही शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे.पावसाळ्यात बैलबंडी, जनावरे शेतापर्यंत जाऊ शकत नाही. बी -बियाणे खते व मजूर यांनाही धड शेता पर्यंत जाण्यास मर्यादा येतात त्या मुळे अशा रस्त्यावरून शेतात जावे लागणाऱ्या शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकांची शेती या मुळे पडीक राहते तर अनेकांना नापिकीचा फटका दर हंगामात सहन करावा लागतो . वाऱ्हा येथील या मार्गांवर शेत असणाऱ्या शेतकऱ्यांना सातत्याने या प्रश्न भेडसावत होता. या बाबत गावकरी एकत्र आले. त्यांनी कधी मंदिरात तर कधी एखाद्या शेतकऱ्याच्या घरी एकत्र येऊन सभा घेतल्या. या वेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश कनाके यांनीही या पांदन रस्त्याचा प्रश्न प्रत्यक्ष भेट देऊन समजून घेतला. गावाकऱ्यांनी अनेकदा पदाधिकारी,शासन- प्रशासनाकडे निवेदने, विनंत्या करून झाले होते. पण कुणीही आस्वासनापलीकडे काहीच केले नाही. त्या उपरं|त गावाकऱ्यांनी लोकवर्गणी करून हा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. रमेश कनाके यांनी या स्तुत्य कार्याला मदतीचा हात दिला.
            वाऱ्हा राळेगाव मार्गांवरील या पांदन रस्त्याचे कामं सुरु झाले. रस्ता सरळीकरण,मातीकाम, मुरूम टाकून खड्डे बुजवणे आदी कामाला गती आली आहे. रमेश कनाके यांनी नुकतीच या कामाला भेट दिली. वाऱ्हा गावालगत असणाऱ्या इतरही पांदन रस्त्याच्या प्रश्न| बाबत सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करु अशी भावना सरपंचा लताताई दत्ताभाऊ घोटेकार यांनी व्यक्त केली. या करीता दत्ताभाऊ घोटेकार, किशोर वाऱ्हेकर, वीरेंद्र वाऱ्हेकर, वसंतराव महाजन, गुणवंत धोटे, विनोद भागवत, भाऊराव अराडे, देवराव अराडे, कवडुजी पुरके यांचे सह अनेकांचे सहकार्य लाभले.

............................
          ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी वर्ग आज संकटात आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडतो, या समस्या आहेतच त्यातच शेतांपर्यंत जायला रस्ताच नाही हे ही एक मोठे संकट आहे. पांदन रस्ते आहेत पण ते पावसाळ्यात शेतांत जायच्या अवस्थेचे राहिलेले नाही. मी राळेगाव, कळम, बाभुळगाव या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना भेटलो, योग्य पांदन रस्ता नसल्याने पेरणी पासून तर पीक काढणीपर्यंत शेतकऱ्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो हे मी पाहिले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या या प्रश्न|कडे संवेदनशीलपणे पाहण्याची गरज आहे.वाऱ्हा येथील शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह म्हणावा लागेल.
      -  *रमेश कनाके*
        सामाजिक कार्यकर्ते