ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या लवकरच मार्गी लावणार - जि प उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या लवकरच मार्गी लावणार - जि प उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर 



ढाणकी प्रतिनिधी - अतिशय अल्प मानधनावर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन जि प उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांनी दिले आहे.  ग्रामरोजगार सेवकांचे मंडळ नुकतेच त्यांना भेटायला व आपल्या समस्या मांडण्याचा साठी यवतमाळ येथे आले होते तेव्हा ते बोलत होते. 
ग्रामस्थरावर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत ग्रामरोजगारांची भूमिका  ही खुप महत्वाची आहे.  कमी मानधन आणि जास्त काम अश्या स्थिती मध्ये रोजगार सेवकांना आपल्या कुटुंबियाचे पालन पोषण करणे सुद्धा अवघड झाले असून मागील 3 वर्षा पासून  मानधन व प्रवास भत्ता  न मिळाल्याने त्यांच्या वर आर्थिक संकट कोसळले आहे.  आता दिवाळी सुद्धा जवळ आली असताना मानधन मिळाले नसल्याने या वर्षीची दिवाळी अंधारात होण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर मानधन मिळान्याची मागणी ग्रामरोजगार सेवकांची आहे. याबाबत बाळासाहेब कामारकर यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून रोजगार सेवकांपुढेच संबंधित  अधिकारयांना योग्य त्या सूचना देऊन रोजगार सेवकांचे समाधान केले व लवकरच मानधन मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. निवेदन देताना रोजगार सेवक संघटनेचे मारोतराव जळके, केशवराव खडसे, नारायण कदम,  किसन जाधव, फाजील खान,  भाऊराव पाईकराव, ढेपे,  गाडेकर,  दत्ता कदम उपस्थित होते.