ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी
आर्णी /प्रतिनिधी
आर्णी तालुक्यात मागील 15 ऑगस्टपासून सतत होणाऱ्या पाऊसामुळे शेत शिवारातील काढणीला आलेल्या कपाशी व सोयाबीन पिकांचे नुकसान होत आहे, हवामान अंदाजानुसार अजूनही बरेच दिवस पाऊस पडण्याची शक्यता दर्शविण्यात आलेली आहे. तेव्हा आता हाथात आलेली पिके ही हातातून निघून जाणार, यात काहीही शंका नाही. तसेही आपल्या जिल्ह्याची पावसाची सरासरी ओलांडलेली आहे.
तेव्हा होणाऱ्या शेती नुकसान यामुळे सरकारने ओला जाहीर करावा असे *आर्णी* तालुक्यातील "आसरा" ह्या गावी राहणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी आहे.
आसरा येथील सरपंच नरेंद्र चव्हाण यांनी तहसीलदार साहेबांना निवेदनाद्वारे कळविले; यावेळी त्यांच्यासोबत उपसरपंच तुकाराम वानखडे तसेच गणेश वानखडे, दिनेश मंडोले, गणेश सावदे, तुकाराम शिंदे, महादेव मडावी, उत्तम राठोड, बाबाराव राठोड, राजेंद्र सावदे, किसन चव्हाण, बंडू मुनेश्वर व बरेच शेतकरी उपस्थित होते.