वणी तालुक्यात अवकाळीमुळे पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल
शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करून नुकसान भरपाई द्या- वैभव कवरासे
वणी तालुक्यामध्ये कापूस चना तूर गहू अवकाळी पाऊसाने तालुक्यातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे सर्वाधिक फटका कापूस , हरभरा गहु पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा खरीप हंगामा वर निसर्गाने सुरवाती पासून अवकृपा दाखवली जुलै व ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीसह पूर परिस्थिती मुळे सोयाबीन कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले आता रब्बी पिकांनाही अवकाळीचा पाऊसाचा फटका बसला आहे.
"शेतीमालाचे कमी झालेले भाव व अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. थोडा वेळ, पण मुसळधार झालेला पाऊस शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून गेला. लवकर लवकर शासनाने पंचनामे करून शेतकऱ्याला आधार द्यावा. योग्य ती मदत करावी." तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.