अर्जुनी येथील घरकुलाच्या यादीत घोळ,ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

अर्जुनी येथील घरकुलाच्या यादीत घोळ,ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

मारेगाव :तालुक्यातील अर्जुनी येथील घरकुल यादीत घोळ झाल्याने या प्रकरणाची चौकशी करावी अशा आशयाच्या मागणीसाठी गावातील ग्रामस्थांनी आज दि ३० नोव्हेंबर रोजी गटविकास अधिकारी पद्माकर मडावी  यांना निवेदन सादर केले.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,  तालुक्यातील अर्जुनी येथे १५ घरकुल लाभार्थ्यांचे  ईश्वर चिट्ठी ठराव मंजूर करण्यात आला होता. यामध्ये १५ जणाच्या नावाची घरकुल यादी तयार करण्यात अली मात्र या नावा व्यतिरिक्त काही जणांना पहिला हप्ता मिळाला असून या मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाले असल्याने दिसून येत आहे. ही घरकुलाची बोगस  यादी तयार करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायतचे उपसरपंच व गावकऱ्यांनी मागणी केली असून  गरजू लाभार्थ्यांना न्याय मिळावा असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या घरकुल योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळावा यासाठी ही योजना सुरू केली. परंतु स्थानिक प्रशासनाकडून चुकीच्या पध्दीतीने अंमलबजावणी होत असल्याने गरजूंना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान प्रशासनाने आयपी कोडच्या माध्यमातून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर उपसरपंच सुनील तोडासे, वासुदेव मडावी, विलास नेहारे, नितीन गोडे, मारोती राऊत, गोवर्धन नेहारे यांच्यासह आदी ग्रामस्थांच्या सह्या आहे.