क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दापोलीत विनम्र अभिवादन

क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दापोलीत विनम्र अभिवादन 

रत्नागिरी :क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त आज 9 जून रोजी पांगारवाडी दापोली येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार घालून व  पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले.यावेळी बिरसा क्रांती दलाचे राज्याध्यक्ष सुशिलकुमार पावरा, सौ.पिंगला पावरा, अमोल पावरा,परी पावरा इत्यादी आदिवासी बांधव उपस्थित होते. 
      बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये झारखंड येथील उलहातू येथे झाला.बिरसा मुंडा यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने १८९५ मध्ये छोटा नागपूर येथे इंग्रजांविरोधात मोठा लढा सुरू केला.इंग्रजांनी त्यांना पकडले व तुरूंगात टाकले. इंग्रजांनी बिरसा मुंडा यांचा खूप छळ केला.  ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची येथील तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला. 
बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे दैवत समजले जाते. जननायक ही पदवी लोकांनी त्यांना बहाल केली. जननायक बिरसा मुंडा,भगवान बिरसा मुंडा,क्रांतीसूर्य बिरसा मुंडा,धरतीआबा इत्यादी नावाने लोक त्यांना ओळखू लागले. बिरसा मुंडा यांचे कार्य देशासाठी व आदिवासी समाजासाठी प्रेरणा दायी होते. आदिवासी समाज त्यांचा आदर्श घेऊन कार्य करत असतो.आमची संघटना सुद्धा बिरसा मुंडा यांच्या नावानेच म्हणजेच बिरसा क्रांती दल अशी आहे.या संघटनेचा मी राज्याध्यक्ष आहे, याचा मला अभिमान वाटतो.बिरसा मुंडा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हाला आदिवासी समाजात क्रांतीकारी कार्य करायचे आहे. असे मनोगत सुशिलकुमार पावरा राज्याध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी व्यक्त केले.
   भगवान बिरसा मुंडा की जय! बिरसा मुंडा अमर रहे! इत्यादी घोषणा यावेळी देण्यात आल्या.